महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्ये पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम, २००६ अंतर्गत प्रकरण दोन मध्ये कलम ३ (१) मधील परंतुकात सेक्रेटरिएट सेवेत असलेल्या कर्मचाऱ्याच्या बाबतीत नेमणुकीच्या पदावधीचा कालावधी नमूद केलेला आहे. परंतु सेक्रेटरिएट सेवेतील कर्मचारी हे साधारणतः स्मरण कृती (मेमरी फॅक्शन) नुसार काम करतात. परिणामतः कर्मचाऱ्याच्या कार्यात तत्परता व गती दिसून येत होती. परंतु एका विभागातून दुसऱ्या विभागात कर्मचाऱ्याच्या केवळ त्या विभागातील पदावधीच्या कालावधीनुसार झालेल्या बदलीमुळे संबंधित कर्मचाऱ्याच्या कार्यक्षमतेवर व काम करावयाच्या गतीवर परिणाम झालेला दिसून येत आहे. त्यामुळे एका टेबलावरून दुसऱ्या टेबलावर किंवा एका विभागातून दुसऱ्या विभागात बदली करताना पदावधीच्या कालावधीची मर्यादा गैरवाजवी असून उक्त अधिनियमाचा हेतू व उद्देश यास बाधक असल्यामुळे उक्त मर्यादेऐवजी कर्मचाऱ्याच्या कार्यक्षमतेच्या आधारावर बदली करण्याचे विहित केल्यास ते नियमास अनुरूप होईल असे वाटते.
Badali Gazette ; महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्ये
